Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

“विचारपूर्वक मतदान करा” – राणेंच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांचं मतदारांना आवाहन

मुंबई वृत्तसंस्था | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोकणात सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर गेले होते. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात बँकेच्या निवडणूकी संदर्भात मतदारांना “विचारपूर्वक मतदान करा” असं आवाहन केलं.

कोकण हा नारायण राणे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. येथे सिधुदुर्ग येथील रत्नागिरी येथे प्रचारसभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हल्लाबोल करत जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं. यासह संस्था उभी करण्यासाठी अक्कल लागते मात्र, अडचणीत आणण्यासाठी अक्कल लागत नाही असं म्हणत राणेंवर उपरोधिकपणे निशाणा साधला.

पुढे बोलतांना त्यांनी, “सिंधुदुर्गच्या जिल्हा बँकेच्या प्रतिनिधींना, मतदारांना, “इतिहास लक्षात घेत सर्वांनी कुणाच्याही दबावाला, दादागिरी आणि दहशतीला बळी न पडता निर्धाराने मतदान करा असं आवाहन केलं.

Exit mobile version