Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उतावळी नदीत 2 युवक बुडाले ; 6 तासानंतर सापडला मृतदेह

yuvak

 

भुसावळ प्रतिनिधी । मध्य प्रदेश व महाराष्ट्र सीमेलगत असलेल्या बऱ्हाणपूर जिल्ह्यातील महल गुलारा येथील उतावळी नदीत 2 युवक बुडाले असून सहा तासानंतर या युवकांचा मृतदेह सापडला आहे.

याबाबत माहिती अशी की, मृत झालेल्या युवकांमध्ये एकाचे नाव समीर असून तो बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील सेफकुवा येथील रहिवासी आहे. तर दुसराचे नाव रेहान असून तो बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील बुधवाडा ग्राम येथील रहिवासी आहे. मित्रांसोबत हे दोघं युवक नदीचा पूर पाहण्यासाठी याठिकाणी आले होते. त्यांनी यावेळी सेल्फी देखील काढला. त्यानंतर ते नदीत पोहण्यासाठी पाण्यात उतरले असतांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही युवक बुडालेले असल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. गेले 6 तासापूर्वी दोन्ही युवक या उतावळी नदीमध्ये बुडाले असून प्रशासनाने गेल्या सहा तासांपासून या दोन्ही युवकांचा शोध घेत होते, अखेर या दोघांचे मृतदेह सापडले आहेत.

Exit mobile version