Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेतीच्या वादातून महिलेसह दोघांना मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतीवादातून महिलेसह दोन जणांना शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना तालुक्यातील देव्हारी शिवारात घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, सुनिता बापू भिल रा. उमाळा ता.जि.जळगाव हा तरूण आपल्या  दोन मुले आणि मुलीसह वास्तव्याला आहे.  मजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. देव्हावरी शिवारातील गट नंबर ६/२ मध्ये  सुनिता भिल यांचे नावे शेत आहे. यापुर्वी हे शेत सुनिता भिल यांच्या वडीलांच्या नावे असल्याने त्यांनी गावातील महेश मनोहर पाटील याला शेती करण्यासाठी दिली होती. दरम्यान,  वडील मयत झाल्याने शेती सुनिता भिल नावावर करण्यात आली. २३ जून रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास शेतात काम करण्यासाठी आले असता महेश पाटील आणि एक ट्रॅक्टर चालक विकास बुआ तेथे आला. व ही शेती आमची आहे असे सांगून दमदाटी करू लागला. त्यावर शेती तुझ्या नावावर आहे असा उतारा आणून दाखव असे सांगितले. याचा राग असल्याने दोघांनी महिलेला शिवीगाळ व मारहाण केली. तर महिलेचा मुलगा ज्ञानेश्वर आणि मुलगी नंदीनी यांनी देखील दोघांवर दगड फिरकावला. दोघेजण पळून गेले. याबाबत ज्ञानेश्वर बापूर भिल (वय-२५) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुरूवार २३ जून रोजी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

Exit mobile version