Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यापीठातील जल शुद्धीकरण मशीन बंद

WhatsApp Image 2019 05 22 at 9.52.13 AM 1

धरणगाव(प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पाण्यासाठी विद्यार्थ्यांना भटकंती करावी लागत आहे. भर उन्हाळ्यात पाणी शुद्धीकरण मशीन धूळ खात पडल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी बघण्यास मिळत आहे.

विद्यपीठांत क्षारयुक्त पाणी येत असल्याने ते पाणी शुद्ध करण्यासाठी मशीन बसविण्यात आली आहे. परंतु, ही मशीन मात्र धूळखात पडलेले दिसून येत आहे. शुद्ध पाणी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे फार मोठ्या प्रमाणावर हाल होताना दिसत आहे. या समस्येकडे विद्यापीठ प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी विद्यार्थ्यांमधून करण्यात येत आहे.

Exit mobile version