Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ठाकरेंच्या बोलण्यात तथ्य नाही : बावनकुळेंचा पलटवार

मुंबई-वृत्तसेवा | आज उध्दव ठाकरे यांनी काढलेला मोर्चा आणि केलेल्या टिकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

आज शिवसेना-उबाठा पक्षाने मोर्चा काढला असून यात उध्दव ठाकरे यांनी जोरदार टिका केली. यावर बावनकुळे यांनी पलटवार केला आहे. उद्धव ठाकरेंच्या ढोंगीपणाचा निषेध करत आहे, अशी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम उद्धव ठाकरेंच्या काळता करत आले असते. जेव्हा उद्धव ठाकरेंकडे अधिकार होते. पण त्यांच्या काळात निषक्रियेमुळे किंवा अनेक कारणे आहेत. उद्धव ठाकरे हे धारावी पुनर्विकास प्रकल्प करू शकले नाही आणि हा प्रकल्प आमच्या काळात होत आहे. धारावीकरांना घरे मिळणार आहे आणि त्याचे राहणीमान उंचवणार आहे, अशा वेळी उद्धव ठाकरे मोर्चा काढत आहेत. या प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंनी ज्याबाबीला मांडल्यात त्यात काही तथ्य नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या ढोंगीपणाचा निषेध करण्याकरिता आलो आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Exit mobile version