Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भांडण सोडण्यासाठी आलेल्या तरूणाला बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । दुसऱ्याचे भांडण सोडण्यासाठी तू आमच्या एरीयात का आला असे बोलून पती-पत्नी व त्यांच्या दोन्ही मुलांनी लोखंडी साखळदंडाने बेदम मारहाण केल्याची घटना शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, किरण शामराव चितळे (वय-२२) रा. श्रीकृष्ण नगर, सुप्रिम कॉलनी आपल्या आईवडील आणि भाऊसोबत राहतो. २८ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास किरण चितळेचे मित्र बापु फकीरा पारधी आणि ज्ञानेश्वर कडुबा कोळी दोन्ही रा. सुप्रिम कॉलनी यांना गावातील आकाश भास्कर विश्वे, भास्कर गंगाराव विश्वे, अजय भास्कर विश्वे आणि भास्कर विश्वे यांची पत्नी यांनी दोघांना मारहाण केली होती. याची माहिती गावातील राहूल पाटील याने किरण चितळेला सांगितले. त्यावर किरण चितळे हा घटनास्थळी गेला असता दुसऱ्याचे भांडण सोडविण्यासाठी तू आमच्या एरीयात का आला असे बोलून चौघांपैकी अजय विश्वे याने हातातील साखळदंड फिरवून किरणच्या डोक्यावर वार केला, त्यात ता जखमी झाली. दुसरा वार करणार तोपर्यंत किरणने घटनास्थळाहून पळ काढला. याप्रकरण किरण चितळे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि गणेश कोळी करीत आहे. 

Exit mobile version