Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

Crime : भांडण सोडण्यासाठी गेलेल्या दोघांवर तिक्ष्ण हत्याराने वार

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील चिंचोली गावात यात्रेत किरकोळ भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या दोन तरूणांवर धारदार हत्याराने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील चिंचोली गावाची यात्रा सध्या सुरू आहे. येथे गावातीलच सच्चिदानंद संजीवन पाटील (वय-२८) हा तरुण त्याचा मित्र गणेश सुरेश मेढे यांच्यासोबत बुधवार १३ एप्रिल रोजी रात्री अडीच वाजता यात्रेत फिरण्यासाठी गेले. त्याठिकाणी किरकोळ भांडण सुरू झाले. यावेळी राजू गवळी राहणार रायपूर कुसुंबा त्याच्यासह इतर अनोळखी दोन जण यांच्यात किरकोळ भांडण सुरू होते. ते भांडण सोडवण्यासाठी सच्चिदानंद पाटील आणि त्याचा मित्र गणेश मेढे हे गेले.  याचा राग आल्याने राजू कोळी आणि इतर दोन जणांनी तीक्ष्ण हत्याराने दोघांवर हातावर आणि दंडावर वार करून दुखापत केली. यात दोघेजण जखमी झाले. दोघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी गुरुवार १४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता सच्चिदानंद पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी राजू कोळी यासह अनोळखी दोन जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गफार तडवी करीत आहे.

 

Exit mobile version