Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हिंगोणा ते न्हावी रस्त्याची दयानिय अवस्था

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणा ते न्हावी तसेच मारूळ फाट्यापासुन गावापर्यंतच्या मार्गावरील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्याची अत्यंत दयानिय अवस्था झाली आहे.

रसत्याच्या झालेल्या या दुर्दैशेमुळे परिसरातील शेतकरी बांधवांसह वाहन चालका मोठा त्रास सोसावे लागत आहे.  हिंगोणा ते न्हावी तसेच मारुळ या प्रमुख मार्गाला जोडणारा फाटया पर्यंतच्या संपुर्ण सुमारे पाच किलोमिटरच्या रस्त्याची मागील दोन वर्षापासुन ठीकठीकाणी मोठमोठे खड्डे  निर्माण झाल्याने नागरीकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे . हिंगोणा ते न्हावी  मार्ग खिरोदा असा हा मुख्य रस्ता रावेर/यावल तालुक्याचे आमदार शिरीष चौधरी यांचा खिरोदा गावाला जोडणारा मार्ग असल्याने यासाठी  नागरीकांना महत्वाच्या मार्गाशी जोडणारा हा एक प्रमुख रस्ता असुन या मार्गावरील रस्त्याकडे लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष देवुन या रस्त्याच्या प्रश्नास मार्गी लावावा अशी अपेक्षाकृत मागणी परिसरातील नागरीकांकडुन होत आहे. 

त्याचप्रमाणे हिंगोणा ते न्हावी रस्त्याची मागील तिन वर्षापासुन अत्यंत बिकट अवस्था झाली रस्त्यावर खड्डे पडल्याने खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे असे चित्र  निर्माण झाल्याने परिसरातील वाहनधारक , शेतकरी शेतमजुरआणी पादचाऱ्यांना या मार्गावरील रस्त्याने वावरतांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाचा प्रश्न आमदार शिरीष चौधरी यांनी लक्ष घालुन हा प्रश्न सोडवावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ बांधव करीत आहे .

 

Exit mobile version