Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वीजेच्या धक्क्याने बैल जागीच ठार

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील नीम शेत शिवारात शेतात कोळपणीचे काम सुरू असतांना विजेच्या खंब्याला स्पर्श झाल्याने बैल जागीच ठार झाल्याची घटना रविवारी ९ जुलै रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. यात घटनेत सुदैवाने काम करणारे शेतकरी थोडक्यात बचावले आहे.

 

अधिक असे की,  अमळनेर तालुक्यातील नीम येथील शेतकरी रोहिदास रामसिंग चौधरी यांचा शेतात रविवारी ९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या शेतात कोळपणीचे काम सुरू होते. यावेळी कोळपणी करत असतांना विजेच्या खंब्याला स्पर्श झाल्याने बैल जागीच ठार झाला. या घटनेत शेतकरी रोहिदास चौधरी हे थोडक्यात बचावले आहे. ऐन कामाच्या मोसमात बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यावर संकट कोसळले असून ३५ ते ४० हजारांचे नुकसान झाले आहे. महावितरण कंपनीकडून शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी परिसरातून केली जात आहे.

Exit mobile version