Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह तापी काठी आढळला

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातून बेपत्ता झालेल्या  सुरेखा जितेंद्र उईके (वय ४४) वर्षे या महिलेचा मृतदेह यावल- जळगाव तालुक्याच्या सीमेवरील असलेल्या तापी नदीच्या किनाऱ्यावर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत अधिक असे की,  सुरेखा जितेंद्र उईके या महिला २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घरी काही एक न सांगता भुसावळातून निघून गेल्या होत्या. सदर महिलेची स्कुटी ही भुसावळ येथील तापी नदीच्या पुलावर आढळून आली हो.ती याबाबत भुसावळ शहरच्या पोलीस ठाण्यात सदर महिला या हरविल्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. महिलेचा मृतदेह शेळगाव बॅरेजच्या  किनाऱ्यावर आढळून आला. यावरून येथील पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.  महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावल येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ प्रशांत जावळे यांनी केले. पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस करीत आहे. मयत महीला यांना एक मुलगा एक मुलगी,पती असे कुटुंब असुन दरम्यान सदर महीलेने आत्महत्या का केली याचे कारण मात्र स्पष्ठ होवु शकले नाही.

 

Exit mobile version