Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विचारधारेची लढाई सुरूच राहिल-राहुलगांधी

नवी दिल्ली-वृत्तसेवा । नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांपैकी चार राज्यांचे निकाल आज जाहीर होत आहेत. या चार राज्यांपैकी तीन राज्यांत भाजपचा विजय तर काँग्रेसचा पराभव जवळपास निश्चित झाला आहे. त्यामुळं अंतिम निकाल येण्यापूर्वीच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पक्षाचा पराभव स्विकारला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करुन आपली भूमिकाही मांडली आहे. त्यांनी म्हटलं, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानातील जनादेश आम्ही नम्रपूर्वक स्विकारतो. ही विचारधारेची लढाई मात्र सुरुच राहिल.

त्याचबरोबर तेलंगणातील जनतेचे मी मनःपुर्वक आभार मानतो. तसेच सर्वसामन्यांचं सरकार स्थापण करण्याचं वचन आम्ही जरुर पूर्ण करु. सर्व कार्यकर्त्यांना त्यांची मेहनत आणि समर्थनासाठी मनापासून धन्यवाद देतो, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version