Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : कंडारी गावात एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू

kandari

भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील कंडारी गावात एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे परिसरासह जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडालेली आहे. मृतांमधील एका महिलेचा उष्माघाताने तर इतर पाच जणांचा अकस्मात मृत्यू झाला आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, कंडारी गावात ३० एप्रिलच्या मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत टप्प्याटप्प्याने ६ जणांचा मृत्यू झाल्याने गावात काही वेळ घाबराहटीचे वातावरण पसरले होते. मृतांमध्ये सायाराबाई शेख गफूर पिंजारी (वय ६५) यांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. तर हरिसिंग चिंतामण पाटील (वय ६०), रामा वामन भालेराव (वय ७५), मीराबाई डोंगर पाटील (६५) काशीराम जयराम महाजन (वय ८२) तसेच उत्तम नारायण तायडे (वय ३८) यांचा अकस्मात मृत्यू झाला आहे. यातील तायडे हे मागील काही दिवसापासून आजारी होते. तर इतरांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. दरम्यान, एकाच दिवशी सहा जणांच्या मृत्यूच्या घटनेमुळे अंधश्रद्धेच्या चर्चांना देखील ऊत आले होते.

Exit mobile version