Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यपालांच्या निर्णयाला शिवसेना न्यायालयात देणार आव्हान

Supreme Court of India

मुंबई प्रतिनिधी । राज्यपाल कोश्यारी यांनी घटनाबाह्य पध्दतीने फडणवीस व अजित पवार यांचा शपथविधी उरकल्याचा आरोप करून या विरोधात शिवसेनेने न्यायालयात धाव घेण्याचे संकेत दिले आहेत.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी रात्रीतून पटापट निर्णय घेऊन राष्ट्रपती राजवट उठवून भल्या पहाटेच शपथविधी उरकल्याने याच्या विरोधात आता शिवसेनेने न्यायालयात दाद मागण्याचे ठरविले आहे. यासाठीचा ड्रॉफ्ट तयार करण्यात आला असून न्यायालयात ही याचिका उद्या दाखल करण्यात येणार असल्याचे समजते. या प्रकरणी राज्यपाल, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या विरोधात अधिकारांचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप करून शिवसेना ही याचिका दाखल करणार आहे. ही याचिका काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सोबतीने दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Exit mobile version