Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शरद पवारांचे उदयनराजेंवर टीकास्त्र

मुंबई प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज स्वत:च्या स्वार्थासाठी दिल्लीश्‍वरांच्या भेटीला गेले नव्हते असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांना खडे बोल सुनावत टीकास्त्र सोडले आहे.

उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर शरद पवार अस्वस्थ झाल्याचे दिसून येत आहे. त्यांनी भोसले यांच्यावर सातत्याने टीका करण्यास प्रारंभ केला आहे. याला उत्तर देतांना उदयनराजे यांनी गेल्या १५ वर्षात आपण निवडून आलो तरी कामे झाली नसल्याची टीका केली. यावर शरद पवार मुंबईतील मेळाव्यात जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या मेळाव्यात ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह सहन करावा लागला. मिर्झाराजे जयसिंग यांच्या सांगण्यावरून आग्र्याला औरंगजेबाच्या दिल्लीश्‍वरांच्या भेटीसाठी ते गेले देखील. परंतु खचून न जाता पुन्हा महाराष्ट्रात परतून त्यांनी नव्याने सर्व किल्ले जिंकले आणि स्वतः हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. या माध्यमातून त्यांनी उदयनराजेंना जोरदार टोला लगावला आहे.

Exit mobile version