लंडन (वृत्तसंस्था) विश्वचषकात भारताचा श्रीलंकेसोबत सुरु असलेल्या सामन्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. सामना सुरू असताना, चक्क मैदानावरून गेलेल्या विमानाच्या मागे “जस्टीस फॉर काश्मीर”असे बॅनर लावले होते. या घटनेमुळे भारतीय संघाच्या सुरक्षेतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
आज भारताचा श्रीलंकेसोबत सामना सुरु आहे. यावेळी लीड्स मैदानावरून एक विमान उडाले. नेहमी प्रमाणे उड्डाण समजून त्याच्याकडे कुणाचेही लक्ष गेले नाही. पण नंतर त्या विमानाने लीड्सवरून सलग तीन चार वेळेस ये-जा केले. काही जणांचे लक्ष त्याकडे गेले असता, विमानाच्या मागील बाजुस एक बॅनर लावलेले होते. या बॅनरवर “जस्टीस फॉर काश्मीर” असे लिहीलेले होते. यामुळे भारतीय संघाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. दरम्यान, भारतीय खेळाडूंची सुरक्षा धोक्यात येणार नाही, यासाठी तत्काळ उपाय योजना सुरु झाल्या असल्याचे कळते.