Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विजेच्या धक्क्याने तरूणाचा मृत्यू

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । बांधकामावर पाणी टाकत असतांना विजेचा धक्का लागल्याचे तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील दसनूर येथे घडली आहे.

याबाबत वृत्त असे की, दसनूर येथील अविनाश बाजीराव पाटील यांचे पुत्र अमित उर्फ ओम (वय २५)हा घराच्या बांधकामावर पाणी टाकत असतांना त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. यात तो जागीच गतप्राण झाला. ही घटना काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.

अमित हा एकुलता एक मुलगा असून सुमारे एक वर्षापूर्वी त्याचा विवाह झाला होता. विशेष बाब म्हणजे कालच त्याचा वाढदिवस होता. त्याच्या मृत्यूने पाटील कुटुंबावर वज्राघात झाला असून परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version