Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

केलेली कामे आणि लोकांच्या विश्‍वासाने विजय मिळाला- रक्षाताई

जळगाव प्रतिनिधी । आजवर केलेली कामे आणि लोकांच्या विश्‍वासाने आपण विजय संपादन करणार असल्याची प्रतिक्रिया खासदार रक्षाताई खडसे यांनी व्यक्त केली.

रावेरमधून खासदार रक्षाताई खडसे या विजयाच्या मार्गावर असून त्यांना दणदणीत बहुमत मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्‍वभूमिवर प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्या भारावून गेल्याचे दिसून आले. त्या म्हणाल्या की, मोदी सरकार आणि राज्य सरकारने कामे केली. तसेच मी स्वत: गत पाच वर्षात कामे केली याचे फळ मला मिळाले. लोकांचा विश्‍वास संपादन करण्यात मला यश लाभले यामुळे विजय साकार होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version