Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बाळासाहेबांनी कमावलेले, उध्दव ठाकरेंनी गमावले ! : रामदास कदमांचा घणाघात

खेड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा उध्दव ठाकरे यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली आहे.

रामदास कदम यांनी खेड येथील शिंदे गटाच्या मेळाव्यात उध्दव ठाकरे यांच्यावर अतिशय शेलक्या भाषेत टीका केली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससोबत जाऊ नये असा सल्ला आपण दिला होता. यासाठी झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदेंकडे बोट दाखवून या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं आहे असं उद्धव ठाकरे शिवसेना नेत्यांच्या बैठकीत म्हणाले होते. मात्र दुसर्‍या दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावाची घोषणा केली असा गौप्यस्फोट कदम यांनी केला.

रामदास कदम पुढे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे वरुन ही सभा पाहून माझा मुलगा उद्धव हा शरद पवारांच्या, सोनिया गांधींच्या नादी लागून वाया गेला असं म्हणत असतील. बाळासाहेबांनी कमवलेलं उद्धव ठाकरेंनी गमावलं असा टोलाही कदम यांनी लगावला. इतकच नाही तर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कशाप्रकारे फसवलं गेलं याचे आपण साक्षीदार आहोत, असं कदम म्हणाले.

Exit mobile version