चाळीसगाव प्रतिनिधी । येथील केमिस्ट भवनात जलसंधारणातून मनसंधारण व्हावे यासाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
![](https://livetrends.news/wp-content/uploads/2024/06/advt-aaj.jpg)
चाळीसगाव तालुक्यात वॉटर कप स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या जलसंधारणातून मनसंधारण व्हावे यास्तव रांजणगाव विकास मंच,निंबाळकर फाउंडेशन व जलसाक्षर अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२ जून रोजी सकाळी १० ते १ या दरम्यान शहरातील केमिस्ट भवन येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यात श्रमजीवींचे मते,मतांतरे जाणून घेत उदभवलेल्या अडचणी व समस्या तसेच भविष्यकालीन नियोजन या विषयावर प्रमुख मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार असून यात चर्चा व संवाद साधला जाणार आहे. या चर्चासत्राला सर्वांनी याप्रसंगी उपस्थित रहावे असे आवाहन रांजणगाव विकास मंच,निंबाळकर फाउंडेशन व जलसाक्षर अभियान यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.