Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उद्योजकांच्या समस्या दूर करणार- मुख्यमंत्री

3Uddhav Thackeray 8

मुंबई प्रतिनिधी । राज्यातील उद्योजकांच्या अडचणी जाणून घेत यांचे निराकरण करणार असल्याची ग्वाही आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली. ते राज्यातील प्रमुख उद्योगपतींशी संवाद साधतांना बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी उद्योग क्षेत्रातील प्रमुखांशी संवाद साधला. उद्योगांना येणार्‍या सर्व अडचणी व समस्या दूर करणार आणि राज्यातून एकही उद्योग बाहेर जाऊ देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योजकांना दिली. राज्यशासन आणि सीआयआय यांच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री शासकीय अतिथीगृहात आयोजित या कार्यक्रमास मान्यवर उद्योजक उपस्थिती होते. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.

य बैठकीस रतन टाटा, मुकेश अंबानी, उदय कोटक, आनंद महींद्र, आदी गोदरेज, हर्ष गोयंका, मानसी किर्लोस्कर, राजेश शाह, आनंद पिरामल, अशोक हिंदुजा, निरंजन हिरानंदानी, वरुण बेरी, महेंद्र तुराखिया, रवी रहेजा, बाबा कल्याणी, गोपिचंद हिंदुजा, सज्जन जिंदाल, गौतम सिंघानिया आदी उद्योगपतींची उपस्थिती होती.

Exit mobile version