Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पोलीस हवालदार भोये आत्महत्येप्रकरणी मोर्चा काढण्याचे आवाहन

यावल प्रतिनिधी । मयत पोलीस हवालदार सखाराम भोये यांच्या आत्महत्ये प्रकरणी पालघर पोलीस स्थानकावर मोर्चा काढण्याचे आवाहन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष लकी जाधव यांनी केले आहे.

वसई तालुक्यातील असलेले तुळींज पोलीस स्टेशन येथे पोलीस हवालदार मयत सखाराम भोये आदिवासी कर्मचारी वाघेरपाडा ठाणापाडा येथील रहिवासी यांनी पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांच्या सततच्या अमानुष वागणुकीला व जातीवाचक शिवीगाळ ला कंटाळून पोलीस निरीक्षक यांच्या दालनात बुधवार दि 23 डिसेंबर 2020 रोजी स्वतःला  गोळी घालून आत्महत्या केली आहे.

पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील असलेले तुळींज पोलीस स्टेशन येथे पोलीस हवालदार मयत सखाराम भोये आदिवासी कर्मचारी वाघेरपाडा ठाणापाडा येथील रहिवासी यांनी पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांच्या सततच्या अमानुष वागणुकीला व जातीवाचक शिवीगाळ ला कंटाळून पोलीस निरीक्षक यांच्या दालनात बुधवार दि 23 डिसेंबर 2020 रोजी स्वतःला  गोळी घालून आत्महत्या केली आहे.

या आदिवासी बांधवाला न्याय मिळवून देण्यासाठी आरोपी  पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा,रॅगिंग ऍक्ट प्रमाणे गुन्हा,अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यांव्ये गुन्हे दाखल करण्यासाठी व पोलीस आयुक्त पालघर यांना या प्रकरणी जाब विचारण्यासाठी व या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी सर्व आदिवासी बांधवांनि मोठ्या प्रमाणावर उपस्थित रहावे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व संघटना ,पदाधिकारी यांनी आपल्या आपल्या पोलीस स्टेशन व जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना व गृहमंत्री यांना निवेदन पाठवण्यात यावे असे आवाहन व सूचना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष लकी जाधव यांनी केले आहे.

 

Exit mobile version