Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

…तर राहुल गांधींना लोकं बुटांनी मारतील ; जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांची जीभ घसरली

download 10

 

श्रीनगर (वृत्तसंस्था) जर राहुल गांधी कलम 370 चे समर्थक असतील. तर लोक त्यांना बुटांनी मारतील,अशा खालच्या शब्दात जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी टीका केली आहे.

 

जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 हटल्यानंतर राज्यपाल सत्यपाल मलिक आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यामधील वाकयुद्ध सुरुच आहे. परंतु टीका करताना राज्यपालांची जीभ घसरली आहे. राज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले की, “राहुल गांधी देशातील प्रतिष्ठित कुटुंबातील आहेत, परंतु ते राजकीय नवशिक्याप्रमाणे वागले आहेत. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राला लिहिलेल्या पत्रात राहुल गांधींच्या वक्तव्याचा उल्लेख केला आहे. गांधींनी हे करायला नको होते. ज्यावेळी देशात निवडणूक होईल, त्यांच्याविरोधात काही बोलण्याची गरज नाही. केवळ एवढेच सांगितले की, राहुल गांधी 370 चे समर्थक आहेत, तो लोक बुटांनी मारतील. दरम्यान, सत्यपाल मलिक यांच्या वक्तव्याचा कॉंग्रेसकडून अद्याप कुठलेही उत्तर आलेले नाहीय.

Exit mobile version