Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जो लोक कुछ भी नही करते है, वो कमाल करते है ; राऊत यांचे नवीन ट्विट

 

sanjay raut

 

मुंबई (वृत्तसंस्था) ‘जो लोग कुछ भी नही करते है, वो कमाल करते है’, असा संदेश असलेले ट्विट शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले आहे. राऊत यांच्या या ट्विटमागे नेमका काय अर्थ दडलाय, याचीच चर्चा सुरू झाली आहे.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १३ दिवस उलटून गेले तरी अद्याप सत्ता स्थापनेची चिन्ह दिसत नाहीत. त्यात शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर आज 6 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. तर भारतीय जनता पक्षाला आता कोणताही प्रस्ताव दिला जाणार नसल्याचे सांगत मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम असल्याचे शिवसेनेने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. आता कोणताही प्रस्ताव येणार नाही, किंवा जाणार नाही, लोकसभा निवडणुकीपूर्वी जे ठरलेय तेच होणार. काहीही झाले तरीही चालेल मुख्यमंत्री मात्र शिवसेनेचाच होणार, असे खासदार राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.

Exit mobile version