Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पवार आणि ठाकरेंची अलीबाबाची टोळी : सदाभाऊ खोत

टेंभुर्णी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | रयत क्रांतीसेनेचे नेते तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका करतांना पवार आणि ठाकरेंची अलीबाबाची टोळी असल्याचा हल्लाबोल केला आहे.

सदाभाऊ खोत यांनी केतकी चितळे यांचे समर्थन करून नंतर सारवा-सारव केली होती. आता त्यांनी पुन्हा एकदा याच प्रकरणी भाष्य केले आहे.ते म्हणाले की, फडणवीस साहेब तुम्ही परत या, आमची केतकी चितळेसारखी  वस्था झाली असल्याचे सदाभाऊ खोत  म्हणाले. केतकी चितळेनं तशी पोस्ट टाकायला नको होती.

वाईट पोस्ट कशाला शेअर करायची? असा प्रश्न विचारत ते पुढे म्हणतात, पण काय झाले या पोस्टमुळे पाटील मेला आहे की नाही हे कळलं, नाहीतर गावाला माहिती नव्हते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  मास्क उतरवणार म्हणे, ते काय चंद्राचा मुखडा आहे का?, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. वीज मोफत, सातबारा कोरा झाला नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, उजनीचे पाणी बारामतीला आणि बारामतीने नीरा नदी लुटल्याचा आरोप त्यांनी केला. तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे अलिबाबाची टोळी असल्याचे ते म्हणाले. शरद पवारांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.

Exit mobile version