Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची तातडीने पंचनामे करा; शिंदे गटाची मागणी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  यावल तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.  शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पंचानामे करावे, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

१६ सप्टेंबर रोजी यावल तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने तापी नदीला महापुर आल्याने तापी काठावरील भालशिव, पिंप्री, टाकरखेडा ,बोरावल या शिवारातील शेतामधील पिकांचे आतोनात नुकसान झाले असून,महसुल प्रशासनाने तात्काळ या परिसरातील नुकसान ग्रस्त शेती पिकांचे पंचनामे करावे व शेतकरी बांधवांना शासना च्या वतीने तात्काळ मदत मिळावी अशी मागणी केली असुन,निवासी नायब तहसीलदार संतोष विंनते यांना देण्यात आलेल्या निवेदनाप्रसंगी तुषार उर्फ मुन्ना पाटील, माजी मसाका संचालक सुभाष आप्पा साळुंके, कैलास कोळी ,विश्वनाथ कोळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते .

Exit mobile version