Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आता पक्षश्रेष्ठीच काय तो निर्णय घेतील : चंद्रकांत पाटील

18 07 2019 chandrakant patil cong 19410435

 

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत असतानाही सरकार स्थापन करण्यास विलंब लागत आहे. मात्र, राज्यात निर्माण झालेल्या स्थितीवर पक्ष नेतृत्व विचार करून योग्य तो निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर दिली आहे.

 

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत राज्यातील सत्तापेचावर कायद्याच्या अंगाने चर्चा केली, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. पाटील पुढे म्हणाले की, सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेला वेळ लागत असल्यामुळे आम्ही राज्यपालांशी चर्चा करायला गेलो होतो. यावेळी आम्ही त्यांना राज्यातील सद्यपरिस्थितीची माहिती दिली. तसेच त्यांच्याकडून कायदेशीर पर्याय जाणून घेतले. आता या चर्चेआधारे भाजप आपला पुढचा निर्णय घेईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्यामुळे सत्तास्थापनेबाबत निर्माण झालेल्या संभ्रमाची स्थिती अजूनही कायम आहे.

Exit mobile version