Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

युती-आघाडीचे साटेलोटे- प्रकाश आंबेडकर

भुसावळ प्रतिनिधी । भाजप-शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादीत साटेलोटे असून लोकशाहीची ही थट्टा थांबवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला विजयी करण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित सभेत बोलत होते.

वंचित बहुजन आघाडीचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवारी नितीन कांडेलकर यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले. यात त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, देशाची सत्ता काँग्रेस-राष्ट्रवादी बीजेपी यांच्याच हातात आहे ते एकमेकांचे नातेवाईक असून त्यांचे साटेलोटे आहे. आपल्या नात्यातीलच आठ उमेदवार असल्याची कबुली राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी दिली असल्याचे अँड प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. ही लोकशाहीची थट्टा आहे. हे थांबविण्यासाठी रावेर लोकसभा मतदार संघातील आघाडीच्या उमेदवाराला विजयी करा असे आवाहन अँड. प्रकाश आंबेडकर यांनी याप्रसंगी केले.

Exit mobile version