Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोदी व शहांनी तरूणांचे भविष्य उद्ध्वस्त केले-राहूल गांधी

rahul gandhi

नवी दिल्ली वृत्तसंस्था । मोदी आणि शहा यांनी देशातील तरूणांचे भविष्य उद्ध्वस्त केले असल्याचा आरोप करून काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी आज जोरदार टीकास्त्र सोडले.

राहूल गांधी यांनी आज एका ट्विटच्या माध्यमातून नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून सरकारवर टीका केली आहे. अर्थव्यवस्था, सुधारित नागरिकत्व कायदा आणि तरुणांच्या आंदोलनावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून भाष्य केलं आहे. मोदी आणि शाह यांनी तुमचं भविष्य उद्ध्वस्त केलं आहे. अर्थव्यवस्थेला पोहोचवलेली हानी आणि घटलेल्या रोजगारामुळे मोदी सरकार तरुणांच्या रागाला सामोरं जाऊ शकत नाही. त्यामुळे ते आपल्या प्रिय असलेल्या भारतामध्ये फूट पाडून द्वेष लपवत आहेत. आपण प्रत्येक भारतीयाविषयी प्रेम व्यक्त करून त्यांचा पराभव करू शकतो, असं राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

Exit mobile version