Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वीज कोसळल्याने तीन जण जागीच ठार, तीन जखमी

thunders

 

जालना प्रतिनिधी । तालुक्यातील भागडे सावरगावात वीज कोसळल्याने तीन जणांचा जगीच मृत्यु झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज दूपारी 2 वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळपासून जालना तालुक्यासह ग्रामीण भागात ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोराचा पाऊस पडत होता. सुमनबाई साहेबराव नाईकनवरे राहणार भागडे सावरगाव यांच्या शेतातील सोयाबीन पिक काढण्याचे काम सुरू असतांना दुपारी अचानकपणे आकाशात ढगांची दाटीवाटी झाली आणि मुरळधार पावसाला सुरुवात झाली. यावेळी सोयाबीन काढणारे मजूर शेतातील एका झाडाखाली बसले अन् काही कळण्याच्या आतच या झाडावर वीज कोसळल्याने गयाबाई गजानन नाईकनवरे (वय-३५), सेवली येथील संदीप शंकर पवार (वय-३०), आणि मंदाबाई नागोराव चाफळे (वय-३५) या तिघांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर सुमनाबाई साहेबराव नाईकनवरे (भागडे सावरगाव), सुनील संदीप पवार (सेवली), सचिन नागोराव चाफळे (सेवली) हे जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच सेवली पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विलास मोरे हे कर्मचा-यांसह घटनास्थळी दाखल झाले.

Exit mobile version