Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

घराघरापर्यंत पोचा याला कितपत प्रतिसाद मिळतो ते पाहू- ना.जयंत पाटील

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्याना पत्रकाद्वारे घराघरापर्यंत पोचा अशा सूचना दिल्या आहेत, याला कितपत प्रतिसाद मिळतो, ते आगामी काळात दिसेलच अशी टीका राष्ट्रवादीचे मंत्री ना. जयंत पाटील यांनी केली आहे.

मनसेचे राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्या संदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले असून मनसैनिकांनी ते पत्रक घराघरात पोचवा असे आवाहन केले आहे, यावरून राज ठाकरे यांचा पक्ष घराघरात पोचेल इतका मोठा नाही, त्यांनी काढलेले मराठी हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषातील पत्रक कितपत पोचते त्याला काय प्रतिसाद मिळतो हे पाहावे लागेल. आणि मग त्यावर बोलणे उचित होईल असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

 

 

 

 

 

Exit mobile version