Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उत्तर प्रदेशात जमिनीच्या वादातून हत्याकांड ; ९ ठार, १४ जखमी

D rJLIvWwAYEBeN

 

सोनभद्र (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातली सोनभद्र जिल्ह्यात जमिनीच्या वादातून बुधवारी झालेल्या गोळीबारात ९ जण ठार तर १४ जन जखमी झाले आहेत. या हत्याकांडात बंदुकीशिवाय अन्य हत्यारांचाही वापर झाला. मृतांमध्ये चार महिला आणि सहा पुरुषांचा समावेश आहे.

या संदर्भात अधिक असे की, दोन वर्षांपूर्वी एका जमिनीच्या खरेदीचा व्यवहार झाला होता. त्यानुसार सपाही गावचा प्रधान यज्ञ दत्त खरेदी केलेली जमीन ताब्यात घेण्यासाठी गेला तेव्हा स्थानिकांनी त्याला विरोध केला. त्यानंतर हा वाद उफाळला. त्यानंतर त्याने व त्याच्या लोकांनी गोळीबार केला. त्यात नऊ जण ठार झाल्याचे कळते. दरम्यान,मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version