Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाकडी येथे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या प्रौढावर चाकूहल्ला; एकावर गुन्हा

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वाकडी येथे किरकोळ कारणावरून भांडण सोडणविण्यासाठी गेलेल्या ५२ वर्षीय इसमावर चाकू हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील वाकडी येथील सुभाष निंबा पाटील व त्यांची पत्नी रोशनी पाटील यांच्यात सोमवार ५ जुलै रोजी रात्री ९:१५ वाजताच्या सुमारास किरकोळ कारणावरून वाद सुरू होता. दरम्यान निंबा पाटील व निर्मलाबाई हे दोघे वाद सोडविण्यासाठी गेले असता. सुभाष पाटील यांनी निर्मलाबाई हिला शिवीगाळ करायला सुरुवात केली. तेव्हा निंबा त्र्यंबक पाटील यांनी त्याला समजविण्यास गेला असता. त्यावर आरोपी सुभाष निंबा पाटील यांनी त्याच्या खिशातून फायबरची मुठ असलेला चाकू काढून निंबा त्र्यंबक पाटील (वय-५२) याच्या पोटात भोसकून गंभीर जखमी केले. हा प्राणघातक हल्ला चढवून तो घरातून पसार झाला आहे. त्यामुळे वाल्मिक त्र्यंबक पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात आरोपी सुभाष निंबा पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संपत अहिरे हे करीत आहेत.

Exit mobile version