Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कंगनाचा नरमाईचा सूर! म्हणाली…’जय मुंबई, जय महाराष्ट्र !’

मुंबई । आपल्या वादग्रस्त ट्विटसमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री कंगणा राणावत हिचा सूर आता नरमल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्राबाबत कृतज्ञता व्यक्त करून तिने माघारीचे संकेत दिले आहेत.

अभिनेत्री कंगना राणावत हिच्या वादग्रस्त वक्तव्यांनी महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. आता मात्र ट्विटमागून ट्विट करणार्‍या कंगनाचा सूर नरमला आहे. महाराष्ट्राबद्दल तिने कृतज्ञता व्यक्त केली आहे.

आज केलेल्या ट्विटमध्ये कंगनाने म्हटले आहे की, ”महाराष्ट्रासह सर्वत्र असलेल्या मित्रांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे कोणतेही शब्द नाहीत. त्यांना माझा हेतू माहित आहे. माझी कर्मभूमी मुंबई आहे आणि मुंबईबद्दल असलेले माझे प्रेम सिद्ध करण्याची गरज नाही. मला स्वीकारणार्‍या मुंबईला मी यशोदा मातेचा दर्जा दिलाय. जय मुंबई, जय मुंबई, जय महाराष्ट्र…,” असे तिने म्हटले आहे.

कंगनाने मुंबईची तुलना पाकिस्तान व्याप्त काश्मीरशी केली होती. तिच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. यावर शिवसेना खासदार संजय राऊत व गृहमंत्री अनिल देशमुखसह अनेक नेत्यांनी तिला खडे बोल सुनावले होते. असे असूनही काल तिने आक्रमक पवित्रा कायम ठेवला होता. मात्र आज अचानक तिचा सूर नरमल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version