Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कंगना राणावत मुंबईत येताच तिला क्वारंटाईन करणार – महापौर

 

मुंबई – अभिनेत्री कंगना राणावत मुंबईत येताच आयसीएमआरच्या मार्गदर्शक प्रणालीनुसार तिला गृह विलगीकरणात पाठवले जाईल, असे बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगीतले आहे.

महापौर पेडणेकर म्हणाल्या की, कंगना राणावत ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे. त्यामुळे नियमानुसार तिला क्वारंटाईन केले जाईल. परराज्यातून येणा-या व्यक्तीला नियमानुसार गृह विलगीकरणात पाठवले जाते. त्यानुसार तिला गृह विलगीकरणात रहावे लागेल. तसेच तिच्या हातावर गृह विलगीकरणाचा शिक्काही मारला जाईल, असे त्यांनी सांगीतले.

हे सर्व आयसीएमआरच्या मार्गदर्शक प्रणालीनुसार महापालिका प्रशासन कार्यवाही करेल असेही महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

Exit mobile version