Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उठा उठा सत्ता गेली आंदोलनाची वेळ झाली ; आव्हाडांचा अण्णांना टोला

Awhad Anna Hazare

 

मुंबई (वृत्तसंस्था) अण्णा, उठा उठा सत्ता गेली आंदोलनाची वेळ झाली,” असा टोला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटवरुन आण्णा हजारे यांना लगावला आहे.

 

आव्हाड यांनी केलेल्या ट्विटमध्ये हजारे यांचा झोपलेला फोटोही अटॅच करण्यात आला आहे. तर त्यावर अण्णा उठा कामाला लागावे लागेल. रामदेव बाबा आहेत तयार. उठा उठा सत्ता गेली… आंदोलनाची वेळ आली, असे म्हटले आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांवर आंदोलनासाठी अण्णा हजारे प्रसिद्ध आहेत. मात्र ते भाजपाविरोधात आंदोलन करत नाही असा आरोप त्यांच्या टीकाकारांकडून केला जातो. यावरुनच आव्हाड यांनी सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आल्याच्या पार्श्वभूमीवर अण्णांवर निशाणा साधला आहे. भाजपाची सत्ता गेली असून आता पुन्हा एकदा हजारे सक्रीय होतील असा सूचक इशारा देत आव्हाड यांनी आपल्या ट्विटमधून हजारे यांना टोला लगावला आहे.

Exit mobile version