Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारत-पाक सीमेवरील गोळीबारात दहीगावचे जवान शहीद

virmaran

 

अहमदनगर वृत्तसंस्था । जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना कोपरगाव तालुक्यातील दहीगावचे जवान सुनील रावसाहेब वाल्टे यांना वीरमरण आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ४० वर्षीय वाल्टे हे लष्करात नायब सुभेदार होते. तर त्यांचा सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पाच वर्षे मुदत वाढवून घेतली होती. तीही आता संपत आल्याने लवकरच ते सेवानिवृत्त होणार होते. तसेच त्यांनी देशातील विविध ठिकाणी त्यांनी सेवा दिली. नुकतीच त्यांना नायब सुभेदारपदी बढती मिळाली होती. मात्र, मंगळवारी झालेल्या कारवाईच्या वेळी गोळीबारात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यात यश आले नसून त्यांना वीरमरण आले आहे. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, एक नववीत शिकणारी मुलगी आणि पाच वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. त्यांचे आई-वडील शेतकरी आहेत.

Exit mobile version