Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मी सागर बंगल्यावर येतो असे म्हणाले जरांगे पाटील आणि स्टेजवर एकच उउाला गोंधळ

आंतरवाली सराटी-लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | मनोज जरांगे पाटील यांनी आज आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी निर्णायक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. फडणवीसांचा मला संपवण्याचा डाव आहे. ते सलाईनमधून मला विष देण्याचा त्यांचा डाव आहे अशी भूमिका घेत त्यांनी फडणवीसांवर आरोप केले.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयर कायदा लागू करा या मागणीसाठी बैठकीत मनोज जरांगे आक्रमक झाले होते. त्यांन फडणवीसांवर आरोप करत सागर बंगल्यावर येतो संपवून दाखवा असे आव्हान फडणवीसांना दिले. बैठक स्थळीवरून अचानक उठताच एकच गोंधळ उडाला आणि उपस्थित मराठा समाजाने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केले. मात्र ते शांत होत नव्हते. मनोज जरांगे पाटील यांना श्वसनेचा त्रास होत होता, पण ते आक्रमक होऊन बोलत होते. उपोषणामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मी सागर बंगल्यावर येतो, माझा बळी घ्या असे मनोज जरांगे बोलत होते.

Exit mobile version