Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यात 2 नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू

Police logo

जळगाव, प्रतिनिधी । आगामी सण, उत्सव, पुण्यतिथी, जयंती तसेच विधानसभा निवडणूकीची आदर्श आचार संहिता लक्षात घेता जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी उद्या 19 ऑक्टोबर ते 2 नोव्हेबरपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणूकीची आदर्श आचार संहिता लक्षात घेवून आगामी सण, उत्सव, पुण्यतिथी, जयंती संपूर्ण जिल्हा हद्दीत 19 ऑक्टोंबर, 2019 च्या सकाळी 6 वाजेपासून ते 2 नोव्हेंबर, 2019 च्या रात्री 24 वाजेपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (3) अन्वये पाच किंवा अधिक लोकांचा जमाव करण्यास पोलीस अधिक्षक, जळगांव यांचे पुर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश लग्न मिरवणुका, धार्मिक मिरवणुका, प्रेतयात्रा यांना लागू असणार नाही. असे जळगावचे अपर जिल्हादंडाधिकारी वामनराव कदम यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Exit mobile version