जळगाव प्रतिनिधी । दहावीत शिकणारा एक अल्पवयीन मुलगा आई-वडिलांच्या नावाने चिठ्ठी लिहून घरातून बेपत्ता झाल्याने पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
शहरातील निमखेडी शिवारातील दिव्यजोती वाटिकाश्रम परिसरात राहणारा एक १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाला. घरातून निघून जाण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. यात माझी वाट पाहू नका, मी घरातून स्वखुशीने पश्चिम बंगालमध्ये जात आहे. मी गेल्यानंतर माझी शोधाशोध करू नका, मी २०२८ मध्ये परत येईन.फ असा मजकूर त्याने चिठ्ठीत लिहिला आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मुलाने त्याच्याकडील मोबाइलमधील दोन्ही सिमकार्ड काढून घरातच ठेवले आहेत. सिमकार्डविना असलेला मोबाइल मात्र तो आपल्या सोबत घेऊन गेला आहे.