Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. विजय माहेश्‍वरी

जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सातव्या कुलगुरूपदी डॉ. विजय माहेश्‍वरी यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी अलीकडेच पाच मान्यवरांनी मुलाखती दिल्या होत्या. यातून डॉ. विजय माहेश्‍वरी यांची कुलगुरूपदी निवड करण्यात आलेली आहे. ते सातवे कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

डॉ. पी. पी. पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेल्या पदावर डॉ. विजय माहेश्‍वरी यांची वर्णी लागली असून ते विद्यापीठाचे सातवे कुलगुरू म्हणून कार्यभार स्वीकारतील. या माध्यमातून विद्यापीठातील प्रभारी कुलगुरू राज संपणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

डॉ. विजय लक्ष्मीनारायण माहेश्‍वरी हे विद्यापीठातील बायो-केमीस्ट्री या विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मध्यप्रदेशातील सागर विद्यापीठातून बी.एस्सी. आणि नंतर बायोकेमिस्ट्रीत एम.एस्सी आणि पीएच.डी. संपादन केली आहे. प्रोटीन बायोकेमिस्ट्री, बायो टिश्यू कल्चर आदी त्यांच्या अध्ययनाचे विषय होते. १९९४ साली राष्ट्रीय पातळीवरील यंग सायंटीस्ट पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.

डॉ. पी. पी. पाटील यांच्या नंतर पुन्हा एकदा कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची धुरा ही विद्यापीठातीलच विभाग प्रमुखाकडे आल्याची बाब लक्षणीय आहे.

Exit mobile version