Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यापिठाच्या विद्या परिषदेवर डॉ. पराग नारखेडे यांची निवड

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्राच्या विद्या परिषदेवर डॉ. पराग नारखेडे यांची आज निवड करण्यात आली असूून त्यांचे अभिनंदन होत आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्राच्या विद्या परिषदेसाठी रविवारी मतदान झाले होते. याची मतमोजणी आज करण्यात आली. यात केसीईएच्या आयएमआरमधील प्राध्यापक डॉ. पराग नारखेडे यांनी अधिसभा सदस्य म्हणून विजय संपादन केला आहे.

डॉ. पराग नारखेडे यांनी एन मुक्तो व मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेतर्फे निवडणूक लढविली होती. त्यांना अध्यापनाचा १७ वर्षांचा अनुभव आहे. विद्यापीठातील गैरव्यवहाराच्या विरोधात नारा बुलंद करून विद्यापिठाचा शैक्षणीक, आर्थिक आणि प्रशासकीय गुणवत्ता उंचावण्यासाठी आपले प्राधान्य राहणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी विजयानंतर दिली आहे. या विजयाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

Exit mobile version