Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

युवक राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे केंद्र सरकारविरूध्द निर्दशने व तहसीलदारांना निवेदन

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेस यावल तालुकाच्या शाखाच्या वतीने राज्य सरकारच्या व केंद्र सरकारचा निषेध करत महागाईच्या विरोधात यावल तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात उपहासात्मक घोषणा देत ‘५० खोके, एकदम ओके’ म्हणत प्रत्यक्षात खोक्यांवर नकली नोटा चिपकवलेल्या खोके घेऊन निदर्शने करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पाटील, यावल तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, राष्ट्रवादी युवक जिल्हा सरचिटणीस विनोद लीलाधर पाटील, राजू काशिनाथ पाटील, राष्ट्रवादीचे समन्वयक किशोर माळी, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष नरेंद्र शिंदे, विरावली विकास सोसायटीचे व्हा.चेअरमन नरेंद्र सोनवणे पाटील, राहुल चौधरी, शाहरुख तडवी, पवन खरचे, हेमंत दांडेकर, सरदार तडवी, गिरीश शिरसागर, विजय भोई, अजय मोरे, लक्ष्मण बारेला, मन्साराम पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, बिस्मिल्ला तडवी, प्रशांत पाटील यासह युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

यावल तहसीदार महेश पवार यांना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “सध्या आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात चालू असलेल्या कारभारामुळे महागाई आवाक्याबाहेर जात आहे. GST चे कोणताही तर्क नाहीत गरिबांची बचत, खाद्य पदार्थ यावरही GST आकारण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय भाव वाढीच्या नावाखाली पेट्रोल दरवाढ डिझेल, रासायनिक खतांची दरवाढ महागाईचा वाढता दर २४.३% पेक्षा वाढता बेरोजगारीचा दर या साऱ्या बाबीमुळे संपूर्ण देशातील जनता हवादील झालेली आहे. शेतकरीपासून तर व्यापाऱ्यापर्यंत गरीबापासून उच्च पदस्त कर्मचारी या सर्वाना महागाईने होरपळले आहे. सध्या देशातील सरकार श्रीमंतांचे सरकार असून देशाला गरिबीत ढकलत आहे. एवढेच नव्हेतर नवीनच महाराष्ट्रात आलेले आहे राज्य शासन हे भोंगळ कारभार करीत आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर न करणे महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय रद्द करणे विकास कामासाठी दिलेली निधी रद्द करणे असे गलथान कारभार कार्य शिंदे सरकार करीत आहे यांचा कारभार म्हणजे ५० खोके महागाई एकदम ओके. या अशा कारभारावर अंकुश लागावा. अशी अपेक्षा आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वतीने करतो. तसेच महागाई लवकरात लवकर नियंत्रणात आणावी; अन्यथा राष्ट्रवादी युवकांच्या वतीने तीव्र आंदोलन घेण्यात येईल.” असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

Exit mobile version