Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाकच्या विमानांना भारताच्या हवाई दलाने पळवून लावले

श्रीनगर वृत्तसंस्था । पाकच्या विमानांनी आज सकाळी भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न भारतीय हवाई दलाने हाणून पाडल्याचे वृत्त आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कालच्या भारतीय हल्ल्यानंतर पाक धास्तावला आहे. यानंतर आज सकाळी पाकच्या काही विमानांनी भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यातील काही विमानांनी बाँबदेखील टाकले. मात्र यात कोणतेही नुकसान झाले नाही. दरम्यान, भारतीय हवाई दलाने प्रत्युत्तराची तयारी केल्याचे पाहताच पाकच्या विमानांनी पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर श्रीनगर, पठाणकोट, लेह आदी विमानतळ बंद करण्यात आले असून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Exit mobile version