जळगाव (प्रतिनिधी)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आजपासून संपुर्ण भारतात सुरू होणाऱ्या प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (पीएम-एसवायएम) (असंगठित कामगारांसाठी पेन्शन योजनेची) चे उद्घाटन करण्यात आले. जळगाव जिल्ह्यात प्रतिनिधी स्वरूपात जळगाव येथे करतांना खासदार ए.टी.नाना पाटील, खासदार रक्षाताई खडसे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आमदार राजुमामा भोळे, जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्यासह अधिकारी व पेन्शन धारक आदी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते.