Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुसऱ्या टप्प्यात राज्यातील १० मतदारसंघात सरासरी २१.४७ टक्के मतदान

Voting 1

मुंबई (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील १० मतदारसंघात सकाळी ११.०० वाजेपर्यंत सरासरी २१.४७टक्के मतदान झाले होते. अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

 

दुसरया टप्प्यात निवडणूक होत असलेल्या बुलडाणा मतदार संघात २०.४९ टक्के, अकोला २१.०३ टक्के, अमरावती २०.०६ टक्के, हिंगोली २४.०८ टक्के, नांदेड २४.४० टक्के, परभणी २६.१७ टक्के, बीड १८.९४ टक्के, उस्मानाबाद २०.०९ टक्के, लातूर २३.१४ टक्के आणि सोलापूरात १६.५० टक्के एवढे मतदान झाले होते.

Exit mobile version