Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देशात संविधान आहे तर कुटुंबात संविधान का नाही ? – आचार्य विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ७ मार्च गुरुवार रोजी आपल्या प्रवचनात ” काही धूप, काही छॉंव ” या विषयावर सुख आणि दुःख याचे स्वरूप स्पष्ट करतांना ते म्हणाले की दुःख आपल्या जीवनात बळ देते समोरचे दुःख स्वीकारा. नकारात दुःख आहे, स्वीकारात आनंद आहे.प्रगत ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आम्हाला वेदना व श्रमा पासुन दुर ठेवते. जेव्हा नैसर्गिक श्रम दूर होतात तेव्हा आपल्याला कृत्रिम श्रमाचा अवलंब करावा लागतो. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जायचे असेल तर त्याचे ४ पर्याय आहेत.

१) नुकसान टाळण्यासाठी तरतूद :- आपल्या चुकांची पुनरावृत्ती टाळा, एकदा चूक करणे हे ऊन असू शकते परंतु त्या चुकातून सावरणे सावली असू शकते चूक माफ होते, चुकीची पुनरावृत्ती माफ होत नाही.

२) लक्ष बदलु टाका :- ज्या पैशाच्या मागे सारे जग धावत आहेत त्या पैशाच्या मागे मला धावायचे नाही आणि ज्या सत्याच्या मार्गावर पाऊल ठेवताना सर्वांना भीती वाटते त्या मार्गावर मला धावायचे आहे , देशात संविधान आहे तर कुटुंबात निश्चित संविधान का नाही ?

३) अडथळे दूर केले जाऊ शकतात :- दृष्टिकोन बदलवून अडचणी सोडवता येतात , चुकीचा दृष्टिकोन म्हणजेच दुःख, एक दिवसासाठी तुम्ही ठरवा की आज मी कसल्याही प्रकारची कोणतीही तक्रार करणार नाही.आणी शेवटचा पर्याय आहे

४) नुकसानीची भरपाई करा :- चुकीच्या वर्तनामुळे होणारे नुकसान चांगल्या वर्तनाने भरून काढता येते. जर चांगले काम करायचे असेल तर कोणतीही वेळ वाईट नाही आणि वाईट करायचे असेल तर कोणतीही वेळ चांगली नाही.

Exit mobile version