Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

योग्य वेळ आल्यावरच बोलेल- अजित पवार

मुंबई प्रतिनिधी । आजचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी आणि यानंतरच्या राजकीय घडामोडींवर आपण योग्य वेळ आल्यानंतर बोलणार असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना दिली.

अजित पवार यांनी आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे प्रचंड खळबळ उडाली. पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्याचे स्पष्ट झाले असून खुद्द शरद पवार यांनी याला दुजोरा दिला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि नेत्यांनी अनेक ठिकाणी अजित पवार यांचा निषेधही केला आहे. या पार्श्‍वभूमिवर, एबीपी माझा या वृत्तवाहिननीशी बोलतांना अजित पवार यांनी आपण आता सध्या तरी काही बोलणार नसल्याचे सांगितले. योग्य वेळ आल्यानंतर आपण बोलणार असल्याचेही त्यांनी याप्रसंगी नमूद करण्यात आले.

Exit mobile version