जळगाव प्रतिनिधी । ए.टी. पाटील यांचे तिकिट कापल्याने जिल्हा भाजपमधील भाऊबंदकीचा नवीन अध्याय सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र ऐन वेळी पक्षातूनच दगाफटका झाल्याचा हा प्रकार नवीन नाही. इतिहासाचे अवलोकन केले असता आजवर तीन नेत्यांना यामुळे खासदारकीच नव्हे तर केंद्रीय मंत्रीपदापासूनही वंचित रहावे लागल्याचे आपल्याला दिसून येते.
जळगाव जिल्हा भाजप-सेना युतीचा बालेकिल्ला असल्याचे कुणीही नाकारू शकणार नाही. आधीचा एरंडोल आणि सध्याच्या जळगाव लोकसभा मतदारसंघात १९८९ पासून मोरेकाकांचा दोन वर्षांचा अल्प अपवाद वगळता भाजपचे वर्चस्व राहिले आहे. तर आधीचा जळगाव व सध्याच्या रावेर लोकसभा मतदारसंघात १९९१ पासून उल्हास पाटील यांची १३ महिन्यांची अल्प कारकिर्द वगळता भाजपचेच उमेदवार विजयी झाले आहेत. या कालखंडात दिवंगत वाय.जी. महाजन व एम.के. अण्णा पाटील या जिल्ह्यातील दोन्ही खासदारांची कारकिर्द एकाच वेळी स्टींग ऑपरेशनमुळे लयास गेली. तर आता स्टींगच्याही पुढील भयंकर प्रकार ए.टी. पाटील यांच्या तिकिटाच्या आड आला. अर्थात, ते जिल्हा भाजपमधील अंतर्गत कलहाचे बळी ठरले. मात्र हा प्रकार फक्त ए.टी. पाटील यांच्याबाबतच घडलेला नाही. इतिहासाची पाने तपासून पाहिली असता हाच प्रकार आधीदेखील घडल्याचे दिसून येते.
हाच प्रकार झाला तो हरीभाऊ जावळे यांच्यासोबत. त्यांनी २००७ आणि २००९ या दोन निवडणुकांमध्ये विजय संपादन केला. यानंतर २०१४ साली त्यांचे रावेर लोकसभा मतदारसंघातून तिकिटदेखील जाहीर झाले. मात्र ऐन वेळी त्यांच्याऐवजी एकनाथराव खडसे यांच्या स्नुषा रक्षाताई खडसे यांना उमेदवारी मिळून त्या
यानंतर आता ए.टी. पाटील यांची तिसर्यांदा खासदार बनण्याची संधीदेखील भाजपमधील अंतर्गत कलहामुळेच हिरावून घेण्यात आल्याची बाब उघड आहे. नानांची गत पंचवार्षिकमधील कामगिरी ही नक्कीच लक्षणीय होती. गेल्या पंचवार्षिकमध्ये त्यांनी लोकसभेत तब्बल ८६ टक्के इतकी हजेरी लावली. ते ८८
(माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाटचालीतही हाच अंतर्विरोध अडसर बनल्याची बाब उघड आहे. मात्र आजच्या राजकीय भाष्यात खासदारकीशी संबंधीत विषय असल्यामुळे याचा समावेश केलेला नाही याची नोंद घ्यावी.)