हतनूरचे १६ दरवाजे उघडले

वरणगाव प्रतिनिधी । हतनूर धरणाचे पाणलोट म्हणजेच विदर्भात दोन दिवस जोरदार पाऊस झाल्याने आज सकाळी ७ वाजता धरणाचे १६ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. 

दरम्यान, आज दि. १२ जुलै रोजी सकाळी ७ वाजता तापी नदीपात्रात ४५,८०३ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहेत. पुढील २४ तासात पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता असल्याने हतनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. असे आवाहन कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांचेतर्फे करण्यात आले आहे.

Protected Content