Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

…आता दिल्ली हादरवणार : हरसिमरत कौर यांचा इशारा

नवी दिल्ली । आधी आम्ही हात जोडत होतो…आता मात्र दिल्ली हादरवणार असल्याचा इशारा माजी केंद्रीय मंत्री तथा अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

आज केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी विधेयकांच्या विरोधात देशभरात बंद पाळून निदर्शने केली जात आहे. दरम्यान, याच विधेयकांना विरोध करत केंद्रीय मंत्रीमंडळातून बाहेर पडलेल्या अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

हरसिमरत कौर बादल या आपल्या समर्थकांसह दमदमा साहिबमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी केलेल्या भाषणात केंद्र सरकारला टार्गेट करण्यात आले. त्या म्हणाल्या की, केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना आमचा विरोध आहे आणि आता अकाली दल या लढ्यात शेतकर्‍यांसोबत आहे असं हरसिमरत कौर यांनी म्हटलं आहे. कृषी विधेयकाविरोधात पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकर्‍यांमध्ये असंतोष असलेला पाहायला मिळत आहे.

Exit mobile version